कोणाला मोर, कोणाला राघू, कोणाला बुलबुल तर कोणाला चिमणी असे छान छान पक्षी आवडतात पण मला विचाराल तर मी सांगेन की मला 'कावळा' आवडतो.
हा हा...हसू नका. असा 'काव-काव' कर्क्कश्श ओरडणारा, काळा, कुरूप पक्षी मला का आवडतो असा प्रश्र्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... तर ऐकाच...मला कावळा का आवडतो ते...
मित्रांनो, मला बोलणं समजायला लागल्यावर मी पहिली गोष्ट ऐकली ती ह्या काऊचीच की...
चिऊ आणि काऊच्या गोष्टीत पावसात चिंब भिजलेल्या कावळ्याला चिऊताई दार उघडत नाही तेव्हापासूनच ह्या कावळ्याविषयी मला फार आपुलकी वाटायची.
कावळा ह्या पक्ष्याविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्या सगळ्या चांगल्या नसल्यामुळे कावळा दिसला तरी माणसे त्याला एरवीच हाकलतात.
पण पित्रुपंधरवड्यात मात्र पूर्वजांसाठी ठेवलेल्या वाडीला चोच मारायला ह्यांना कावळाच हवा असतो आणि खाण्यापिण्याविषयी फारसे चोचले न ठेवणारा कावळा वाडीतील खाऊ खातो आणि माणसांना समाधान देतो.
भारतात हा पक्षी सर्वत्र आढळतो. कदाचित म्हणूनच पूर्वीच्या काळी फोन आणि वाहने नसताना लग्न होऊन सासरी आलेली मुलगी कावळ्याला बघून आपल्या आईच्या आठवणीने व्याकूळ व्हायची आणि त्याची काव-काव म्हणजे जणू आपल्या माहरून कोणीतरी येणार असल्याची वर्दी देत आहे असे वाटून तिला 'ती काव-काव' सुद्धा हवीहवीशी वाटायची.
प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनीसुद्धा विठुमाऊलीची वर्दी देणाऱ्या कावळ्याचे वर्णन
पैलतोगे काऊ कोकताहे...
शकून गे माये...सांगताहेत
असे केले आहे.
मित्रांनो, असा हा आपल्या सगळ्यांनाच जवळचा वाटणारा हा पक्षी प्रत्यक्षातसुद्धा फार मोठ्या मनाचा आहे.
कोकीळ पक्षाची मादी आपली अंडी नकळत कावळ्याच्या घरट्यात टाकून जाते. पिले बाहेर येईपर्यंत कोकीळेची अंडी कावळीणबाई उबवतात.
पक्षी निरीक्षकांनी सांगितले आहे की कावळा जेव्हा झाडावर उंच घर बांधतो तेव्हा पाऊस कमी पडतो आणि जेव्हा कमी उंच म्हणजे खाली बांधतो तेव्हा पाऊस जास्त पडतो.
आता मला सांगा, इतका चांगला, हुशार कावळा केवळ काळा म्हणून आवडत नाही असे म्हणणे चांगले का? आपल्या सगळ्यांना आपल्यातल्याच वाटणारा हा कावळा पक्षी मला खूप भावतो...खूप आवडतो.
सुकृता पेठे
हा हा...हसू नका. असा 'काव-काव' कर्क्कश्श ओरडणारा, काळा, कुरूप पक्षी मला का आवडतो असा प्रश्र्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... तर ऐकाच...मला कावळा का आवडतो ते...
मित्रांनो, मला बोलणं समजायला लागल्यावर मी पहिली गोष्ट ऐकली ती ह्या काऊचीच की...
चिऊ आणि काऊच्या गोष्टीत पावसात चिंब भिजलेल्या कावळ्याला चिऊताई दार उघडत नाही तेव्हापासूनच ह्या कावळ्याविषयी मला फार आपुलकी वाटायची.
कावळा ह्या पक्ष्याविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्या सगळ्या चांगल्या नसल्यामुळे कावळा दिसला तरी माणसे त्याला एरवीच हाकलतात.
पण पित्रुपंधरवड्यात मात्र पूर्वजांसाठी ठेवलेल्या वाडीला चोच मारायला ह्यांना कावळाच हवा असतो आणि खाण्यापिण्याविषयी फारसे चोचले न ठेवणारा कावळा वाडीतील खाऊ खातो आणि माणसांना समाधान देतो.
भारतात हा पक्षी सर्वत्र आढळतो. कदाचित म्हणूनच पूर्वीच्या काळी फोन आणि वाहने नसताना लग्न होऊन सासरी आलेली मुलगी कावळ्याला बघून आपल्या आईच्या आठवणीने व्याकूळ व्हायची आणि त्याची काव-काव म्हणजे जणू आपल्या माहरून कोणीतरी येणार असल्याची वर्दी देत आहे असे वाटून तिला 'ती काव-काव' सुद्धा हवीहवीशी वाटायची.
प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनीसुद्धा विठुमाऊलीची वर्दी देणाऱ्या कावळ्याचे वर्णन
पैलतोगे काऊ कोकताहे...
शकून गे माये...सांगताहेत
असे केले आहे.
मित्रांनो, असा हा आपल्या सगळ्यांनाच जवळचा वाटणारा हा पक्षी प्रत्यक्षातसुद्धा फार मोठ्या मनाचा आहे.
कोकीळ पक्षाची मादी आपली अंडी नकळत कावळ्याच्या घरट्यात टाकून जाते. पिले बाहेर येईपर्यंत कोकीळेची अंडी कावळीणबाई उबवतात.
पक्षी निरीक्षकांनी सांगितले आहे की कावळा जेव्हा झाडावर उंच घर बांधतो तेव्हा पाऊस कमी पडतो आणि जेव्हा कमी उंच म्हणजे खाली बांधतो तेव्हा पाऊस जास्त पडतो.
आता मला सांगा, इतका चांगला, हुशार कावळा केवळ काळा म्हणून आवडत नाही असे म्हणणे चांगले का? आपल्या सगळ्यांना आपल्यातल्याच वाटणारा हा कावळा पक्षी मला खूप भावतो...खूप आवडतो.
सुकृता पेठे
No comments:
Post a Comment